पावसाळ्यातील थरार


थोडेसे आडवाटांवर भटकायला लागल्यावर अजस्त्रकड्याच्या उदरात दडलेली लेणी भेटतात आणि अजून अशी किती अदभुत रहस्य या सह्याद्रीच्या उदरात दडून राहिलीयेत याचा विचार करायला भाग पडते. 

तब्बल एक महिना सक्तीची विश्रांती झाली आणि परत एकदा वेध लागले ते ट्रेकचे. कुठे जायचे? यावर चर्चासत्र सुरु झाली आणि 'या विकेंडला सगळीकडे कुत्र्यासारखा पाऊस आहे व कुत्र्यागत काम आहे रे' असे बोल ऐकू येऊ लागले. एरवी वाढत जाणाऱ्या भारताच्या लोकसंख्येला ट्रेकचा विषय निघाला कि गळती लागते हे खरेच न उलगडणारे कोडे आहे, यावेळेसही तसेच झाले. अखेरीस 'इन-मीन-तीन' जण तयार झाले आणि 'तीन तिघाड काम बिघाड' न होता रात्री उशीरा प्लॅन पक्का झाला.