रतनगड उतरून खाली यायलाच चार वाजलेले. पोटपूजा
करुन इतर मंडळींचा निरोप घेतला आणि राजूर गाठले तेव्हा तिन्हीसांज होत आलेली. अजुन
एक दिवस हाताशी होता त्यामुळे हरीशचंद्रगड का आजोबा अशी द्विधा मनस्थिती झालेली.
हरीशचंद्रगड जीतका ओळखीचा तीतकाच अनोळखी आजोबा किल्ला. अखेरीस चहाच्या घोटाबरोबर
तो प्रश्न निकालात निघाला आणि आम्ही आजोबाकडे निघालो. कुमशेतमध्ये चौकशी केली तर
गाडी अजून पुढे ठाकुरवाडीपाशी जाईल असे कळाले. कच्च्या रस्त्यावरुन पुढे जाताना
अंधारात डोळे चमकलेले दिसले. पहिल्यांदा गाडीच्या काचा वरती केल्या व गाडी मागे
घेऊन बघितले तर कोल्होबांनी दर्शन दिले.