आषाढी एकादशी - २७ जुलै २०१५


 आषाढी एकादशी म्हणले की अजूनही आठवते..पहाटे पहाटे जाग यायची ती पंडित भीमसेन जोशी यांचे लाऊडस्पिकरवरील अभंगांचे स्वर कानावर पडले की..घरी सगळ्यांचाच उपवास त्यामुळे आपसुकच घडलेला उपास

कुर्डुगड - निसणीची वाट १३-१४ जून २०१५


गडकिल्ले फिरण्याच्या नादात अनेक घाटवाटा करायच्या राहुनच गेल्यात. यावेळेस मात्र कुर्डुगड आणि निसणीची घाटवाट असा दुहेरी योग साधायचा असे ठरवुनच निघालो. तसे आठवडाभरात कोकण ते नाशिक या पट्टयातील अनेक ट्रेक आणि घाटवाटा 'हे नको..ते करू'

इंद्रायणी/चंद्रसेनगड/टोपी - चांदवडचा किल्ला २३ डिसेंबर २०१४



बऱ्याचदा असे होते की आपल्या समोरील सगळेच मार्ग अचानक कुठेतरी गुडुप होऊन जातात. आता पुढे काय? या संभ्रमात आपण हरवून जातो आणि त्याचवेळी अचानक कोणीतरी देवदूतासमान आपल्यापुढे उभा ठाकतो, आपल्याला मार्गदर्शन करण्याकरीता. सहयाद्रित भटकताना असे असंख्य अनुभव आलेत, इंद्रायणी किल्ला बघायला गेलो तेव्हाही याच अनुभवाचा पुनःप्रत्यय आला.

अंधारबन (९ ऑगस्ट २०१४)


सारखा काय घरी बसून असतोस रे, जरा बाहेर जात जा. आमच्या अर्धांगिनी कडून हे वाक्य ऐकल्यावर मी परत एकदा खात्री करून घेतली. नक्की जाऊ ना? होकार मिळाला आणि सुरु झाली परत एकदा सह्याद्रीत भटकंती. नवीन वर्षाची सुरुवातच राजगडावर झाली, सूर्योदयाचे दर्शन सुवेळामाची वरून घेतले आणि तेव्हाच खात्री पटली की हे वर्ष भटकंतीसाठी उत्तम ठरणार.

रायगड - बुलेट राईड - ५ जुलै २०१५



जून महीना अखेरपर्यंत पाऊस चांगलाच सुरु झालेला. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि पावसाने परत एकदा दडी मारली. दरवर्षीप्रमाणे या वर्षीहि 'कमरेवरचे हात सोडुनी आभाळाला लाव तुढगाला जरा हलवुनी भिजव माझा गाव तुहे  गार्‍हाणे या वर्षीहि पांडुरंगाकडे मागावे लागणार अशी लक्षणे दिसू लागली. तब्बल एक आठवडा पावसाने

रायरेश्वर - नाखिंद २८ जून २०१५




आजवर रायरेश्वरला अनेकवेळा भेट दिली पण नाखिंद करायचे राहून गेलेले. हाती असलेला रविवार आणि पावसाने दिलेली जराशी उघडीप, मग पहिला प्लॅन ठरला तो नाखिंदचा. एकच दिवस असल्यामुळे पहाटे ४ वाजताच घर सोडले. आनंदनगरला कोणीतरी माथेफिरुने बऱ्याच बाईक आणि कार जाळल्यामुळे सकाळी सकाळी पोलीस आणि अग्निशामक