भारत-पाकिस्तान मॅचने सगळे वातावरण क्रिकेटमय
बनवून टाकले होते. आम्ही मात्र भांबार्डेचा ताजमहल
(नवरा-नवरी-करवली) पहायला १४ तारखेला रात्रीच निघालो. जुन्या मुंबई-पुणे हायवेला
लागलो आणि बाईक सुसाट ताणल्या. थंडी कमी झालेली पण त्या वेगाला अंगाला झोंबणारे बोचरे वारे चांगलीच हुडहुडी भरवत होते, तरीही वेगाचे वेड काही
सह्याद्रिचे हे बेलागकडे नेहमीच मला खुणावतात, गगनाला भिडुनही धरणीशी नाते तोडू नये हेच शिकवतात सागर
सिंहगड - ८ फेब्रुवारी २०१५
रविवार सकाळी सिंहगड म्हणजे अनेक हवशे-नवशे लोकांची जणु
झुंबडच असते. पंढरीच्या वारीप्रमाणे दर रविवारी न चुकता येणारे,
कुणी
फक्त फोटु-फोटु खेळायला आलेले, कुणी फिटनेससाठी अवजड बोचकी खांद्यावर बाळगत चालणारे,
तर
कुणी रमत-गमत गप्पा-गोष्टी करत चालणारे. इथे पहिल्या पाच मिनिटांत 'आता थोडे थांबुयात'
म्हणणारे
पण
घाटवाटा - उपांड्याघाट ते मढेघाट १४ डिसेंबर २०१४
रविवारी सकाळी ६ वाजता निघणार होतो पण चारचे आठजण झालेले त्यामुळे वाट पाहण्यात एक तास खर्ची पडला. सरतेशेवटी 'विनायक, राहुल, मंदार, संजय, गणेश, विराट, ऐश्वर्या आणि मी' असे ८ जण सकाळी ७ वाजता सिंहगड रोडवरून निघालो. पाबेघाटात ढग व धुक्याचा अप्रतिम नजराणा व त्यातूनच डोकेवर काढणारे राजगड व तोरणा असे दृष्य अनुभवले. वेल्हयात नाष्टा करुन पुढे निघालो. केळदखिंड पार करून मढेगाव गाठले. 'गाड्या गावातच लावा, म्हणजे नीट राहतील' हे गावकऱ्यांचे म्हणणे दुर्लक्षित केले (परत आल्यावर कळले की एका गाडीतले पेट्रोल कोणीतरी काढले) व वाट विचारुन गाड्या तशाच पुढे दामटल्या. मढेघाटतील धबधब्याकडे जाताना डावीकडे एका शेडखाली गाड्या लावल्या व उपांड्याघाटाची वाट धरली. खिंडीत पोचल्यावर दिसणारे दृश्य लाजवाबच होते. डावीकडे दुरवर धुक्यातुन डोकावणारा वरंधाघाट व कैवल्यगड (कावळ्या), खालील बाजूस दिसणारी हिरव्यागर्द झाडित वसलेली गावे तर उजव्याबाजूस दिसणारा मढेघाट व त्या पलिकडिल गाढवकडा. सगळा परिसर न्याहाळतच खाली उतरायला सुरुवात केली. वाट चांगलीच रूळलेली आहे व सोबतीलाच पाण्याची पाइपलाइन त्यामुळे चुकण्याचा प्रश्नच येत नाही. साधारण तासाभरातच कर्णवाडीत पोचलो. उजवीकडे जाणाऱ्या छोट्याश्या गाडीरोडने पुढे गेल्यावर उजव्या बाजूला विहीर लागते. त्यापुढिल चार घरे सोडली की उजव्या बाजूला एक पाउलवाट वरती जाताना दिसते. तीच वाट मढे घाटातून वाहणाऱ्या धबधब्याच्या वाटेला मिळते. खरी वाट धबधब्याच्या वाटेच्या डाविकडून वरती जाते पण आम्ही धबधब्याच्या वाटेनेच वरती निघालो व हरिश्चंद्रगडाच्या नळीच्या वाटेचा अनुभव घेतला. वाटेतच जरावेळ विश्रांतीसाठी थांबल्यावर बॅगेतून फळे, ब्रेड, बटर असे जिन्नस बाहेर डोकावु लागले. ते पोटात ढकलुन वरती वाटेतीलच थंडगार पाणी पिले. धबधब्याच्या छोट्याश्या धारेखाली डोके भिजवल्यावर आत्मापण शांत झाला. त्यानंतरची अर्ध्या-पाउण तासाची खडी चढण मात्र चांगलीच दमछाक करणारी होती. सरते शेवटी मढेघाटाच्या माथ्यावर पोचलो. थंडगार वाऱ्याने धबधब्यातील तुषारांचा अंगावर शिडकाव होताच उरलासुरला शिणवटाही दूर झाला. चार तासांच्या छोट्याश्या ट्रेकची सांगता झालेली. गाड्या काढून परतीचा मार्ग धरला परंतु मुसळधार पावसात चिंब भिजत या घाटवाटा अनुभवायची रुखरुख मात्र तशीच मागे राहिली. त्यासाठी आता वर्षभर थांबण्याशीवाय गत्यंतर नाही.
बामणोली - ८ नोव्हेंबर २०१४
वासोटा - सह्यवेडे ८,९ नोव्हेंबर २०१४
वयवर्ष ६ ते ८२ सर्व वयोगटातील मिळून ७० हरहुन्नरी कलाकार सामील झाले होते आणि विशेष म्हणजे ज्या उत्साहाने ६ वर्षाचे पोर उड्या मारत गड चढत होते, तोच उत्साह, आनंद, कुतूहल ८२ वर्षाच्या आजोबांच्या चेहर्यावरपण होते. रात्रभर रंगलेला गप्पांचा फड, जुन्या-नवीन गाण्यांनी सजलेली अंताक्षरी, श्री. अरुण लोंढे काकांनी बाजावर (mouth organ) वाजवलेली व सोबतच सुरेल आवाजात गायलेली जुनी गाणी, लुप्त होत चाललेल्या मर्दानी खेळांचे ‘दांडपट्टा व लाठी’ शिवामृत सूर्यवंशीने दाखवलेले चित्तथरारक प्रात्यक्षिक, वयाची सत्तरी पार केल्यावर नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण करताना आलेल्या अनुभवांचे श्री. अशोक चौबळ यांनी केलेले कथन. सोबतीला वासोट्याच्या घनदाट जंगलवाटा, दूरवर खुणावणारी नागेश्वर, चांगदेव, रसाळ, सुमार, महिपतगडची डोंगररांग, भग्न वाडयाचे गतवैभवाची जाणीव करून देणारे अवशेष, घनदाट जंगलाच्या वेढ्यातुन डोकेवर काढणारा जुना वासोटा व कितीही डोळे विस्फारून पहिले तरी नजरेत न सामावणारा ‘बाबुकडा’.
सगळेच कसे एकदम फक्कड जमून आले. बऱ्याच वर्षांपासून करायचा राहून गेलेला वासोटा ट्रेक 'सह्यवेडे' ट्रेकर्समुळे एक अविस्मरणीय अनुभव देऊन गेला.
आजोबा किल्ला - २८ सप्टेंबर २०१४
आठवणी
दिवाळी
सर्वत्र दिसणारा रंगीबेरंगी आकाशदिव्यांचा लखलखाट, भल्यापहाटे सुगंधी उटणे लावून केलेले अभ्यंगस्नान, नविन कपड्यांची घडी मोडून सर्वात आधी फटाके फोडायला जाण्यासाठी चाललेली धावपळ, मित्रांबरोबर गप्पागोष्टी करत देवळात जाणे, 'चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे, अनारसे' अशा बहुरंगी फराळावर सर्व मित्रमंडळीं जमवून यथेच्छ ताव मारणे, जिथे बांधकाम चालू असेल तेथून माती-वीटा पळवुन आणून बनवलेला किल्ला, तो बनवताना सर्वांग चिखलाने माखल्यामुळे बसलेला ओरडा, दिवाळीतील गृहपाठाचा ससेमिरा चुकवून दुपारी रंगलेला पत्यांचा डाव, सुट्टीत सहकुटुंब केलेली एखादी सफर.
अशा अनेक रम्य आठवणींनी मंतरलेला दिवाळीतील काळ, आता मात्र रोजच्या धावपळीच्या शर्यतीत कुठेतरी हरवून गेलाय. आता फक्त दिसतो तो चकचकीत ऑफिसच्या काचेतुन बाहेरील आकाशदिव्यांचा लखलखाट, पण त्यांचा प्रकाश काही माझ्यापर्यंत पोहचत नाही.
एक प्रवास
सभोवताली अस्सिम गर्दी असुनही एकट्यानेच चाललेला ट्रेनचा प्रवास, नशिबानेच मिळालेली खिडकितली जागा, संध्याकाळची उलटून गेलेली कातारवेळ , निरभ्र आकाशात आपल्याबरोबर धावणारी शुभ्र चंद्रकोर, अंगाला झोंबणारा थंडगार वारा, बोगद्यातुन जाताना अंगावर उडालेले तुषार, सोबतीला मागील भेटितील आठवणी व कानात गुनगुनणारा सौमित्र. कधीच संपुनये असा वाटणारा प्रवास शेवटी आपले स्टेशन येते व भुतकाळात हरवलेल्या आपल्या मनाला वर्तमानकाळात आणून सोडतो. मागे राहतात त्या फक्त्त आठवणी ज्या पुरून उरणार असतात पुढील प्रवासापर्यंत.
सागर मेहता
Subscribe to:
Posts (Atom)