मोरगिरी किल्ला |
सह्याद्रिचे हे बेलागकडे नेहमीच मला खुणावतात, गगनाला भिडुनही धरणीशी नाते तोडू नये हेच शिकवतात सागर
मोरगिरी - २९ नोव्हेंबर २०१५
आजोबा किल्ला
रतनगड उतरून खाली यायलाच चार वाजलेले. पोटपूजा
करुन इतर मंडळींचा निरोप घेतला आणि राजूर गाठले तेव्हा तिन्हीसांज होत आलेली. अजुन
एक दिवस हाताशी होता त्यामुळे हरीशचंद्रगड का आजोबा अशी द्विधा मनस्थिती झालेली.
हरीशचंद्रगड जीतका ओळखीचा तीतकाच अनोळखी आजोबा किल्ला. अखेरीस चहाच्या घोटाबरोबर
तो प्रश्न निकालात निघाला आणि आम्ही आजोबाकडे निघालो. कुमशेतमध्ये चौकशी केली तर
गाडी अजून पुढे ठाकुरवाडीपाशी जाईल असे कळाले. कच्च्या रस्त्यावरुन पुढे जाताना
अंधारात डोळे चमकलेले दिसले. पहिल्यांदा गाडीच्या काचा वरती केल्या व गाडी मागे
घेऊन बघितले तर कोल्होबांनी दर्शन दिले.
कोथळेचा भैरोबा-सांदण व्हॅली-पेमगिरी(शहागड़) किल्ला १२-१३ सेप्टेंबर २०१५
कोथळेच्या भैरोबाला दंडवत
घालुन खाली उतरलो तेव्हा तिन्हीसांज होत आलेली. गाडीजवळ पोहोचलो आणि एक लांडोर
मोठ्याने आवाज करत आम्हाला दचकावून जंगलात शिरली. गाडी काढली आणि मुक्कामासाठी
घाटगरकडे निघालो. गावागावात साजरा होणारा बैलपोळा रंगात आलेला. सजवलेले बैल मोठ्या
दिमाखाने मिरवणुकीत मिरवत होते. आजुबाजुस असलेले घाटमाथे ढगांत हरवत चाललेले.
राजूर गाठल्यावर दोन-दोन कप चहा मारला आणि तरतरीत झालो. रात्रीच्या जेवणानंतर गोड
हवे म्हणून राजुरचे सुप्रसिद्ध पेढे बांधून घेतले. अंधाराचे साम्राज्य पसरलेले आणि
आमची 'जंगल सफारी' सुरु झाली.
मोहनगड - श्री. जननी देवी मंदिर ६ सेप्टेंबर २०१५
शनिवारी दुपारी निघुन रविवारी संध्याकाळपर्यंत
परत असा ट्रेक करायचा बेत ठरला. दोन-चार जणांना 'येणार का?' विचारल्यावर त्यांनी नन्नाचा पाढा गायला. मग
अजुन कोणाला विचारण्यापेक्षा 'एकला चलो रे' हेच बरे असे ठरवले. पण जायचे कुठे हा मोठ्ठा
प्रश्न होता. प्रसादने 2-3
घाटवाटा किंवा मोहनगड सुचवले. पण शनिवारी दुपारपर्यंतचा वेळ कामे उरकण्यात
गेला आणि कुठे जायचे याची काहीच माहिती मिळवली नव्हती. मग शनिवारी निघायचे रद्द
करुन मस्त झोप काढली. सरतेशेवटी रात्री 'गुगल अर्थ' वर घाटवाटा पालथ्या घालण्यात रात्रीचे २ वाजले.
एक-दोन चांगले प्लॅन ठरवले पण #लोभी ट्रेकनंतर पायाला आलेले ब्लिस्टर्स नुकतेच कुठे बरे झालेले, त्यामुळे परत ओले बुट घालुन ८-१० तासांची
तंगडतोड नको म्हणून घाटवाटा रद्द झाल्या आणि मोहनगडवर एकमताने शिक्कामोर्तब झाला.
लोणावळा ते भीमाशंकर (लोभी) २१-२३ ऑगस्ट २०१५
बऱ्याच
दिवसांपासून डोक्यात घोळणारा 'लोभी' ट्रेक करायचा ऑगस्टमध्ये नक्की झाले. ब्लॉग, नेटवरील माहिती, मॅप वाचून सगळी माहिती मिळवली. ७ वेळा हा ट्रेक केलेल्या प्रसादला भेटून वाट
समजावून घेतली. सगळा प्लॅन तयार झाला, यावेळेस एकटेच जायचे ठरवले, पण एक-एक जण
जोडत जाऊन चार जण
झाले आणि परत सगळा सावळा गोंधळ सुरु झाला.
आषाढी एकादशी - २७ जुलै २०१५
आषाढी एकादशी
म्हणले की अजूनही आठवते..पहाटे पहाटे जाग यायची ती पंडित भीमसेन जोशी यांचे
लाऊडस्पिकरवरील अभंगांचे स्वर कानावर पडले की..घरी सगळ्यांचाच उपवास त्यामुळे
आपसुकच घडलेला उपास
इंद्रायणी/चंद्रसेनगड/टोपी - चांदवडचा किल्ला २३ डिसेंबर २०१४
बऱ्याचदा असे
होते की आपल्या समोरील सगळेच मार्ग अचानक कुठेतरी गुडुप होऊन जातात. आता पुढे काय? या संभ्रमात आपण हरवून जातो आणि त्याचवेळी
अचानक कोणीतरी देवदूतासमान आपल्यापुढे उभा ठाकतो, आपल्याला मार्गदर्शन करण्याकरीता. सहयाद्रित भटकताना असे असंख्य अनुभव आलेत, इंद्रायणी किल्ला बघायला गेलो तेव्हाही याच
अनुभवाचा पुनःप्रत्यय आला.
अंधारबन (९ ऑगस्ट २०१४)
सारखा काय घरी बसून असतोस रे, जरा बाहेर जात जा. आमच्या अर्धांगिनी कडून हे वाक्य ऐकल्यावर मी परत एकदा
खात्री करून घेतली. नक्की जाऊ ना? होकार मिळाला आणि सुरु
झाली परत एकदा सह्याद्रीत भटकंती. नवीन वर्षाची सुरुवातच राजगडावर झाली, सूर्योदयाचे दर्शन सुवेळामाची वरून घेतले आणि तेव्हाच खात्री पटली की हे
वर्ष भटकंतीसाठी उत्तम ठरणार.
रायगड - बुलेट राईड - ५ जुलै २०१५
जून महीना अखेरपर्यंत पाऊस चांगलाच सुरु झालेला. शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आणि पावसाने परत एकदा दडी मारली. दरवर्षीप्रमाणे या वर्षीहि 'कमरेवरचे हात सोडुनी आभाळाला लाव तु, ढगाला जरा हलवुनी भिजव माझा गाव तु' हे गार्हाणे या वर्षीहि पांडुरंगाकडे मागावे लागणार अशी लक्षणे दिसू लागली. तब्बल एक आठवडा पावसाने
तिकोणा - सेल्फीचा निष्फळ प्रयत्न
धो-धो कोसळणाऱ्या पावसात भटकंतीचा आनंद काही वेगळाच. घरी बसून कंटाळा आला मग काय? रात्री १२ वाजता उद्या ट्रेकला जाऊन येतो हे सांगितले व पहाटे ५ वाजता घर सोडलेपण. एकटाच निघालो पण सोबतिला होता तो रौद्रतांडव करणारा पाऊस, सकाळची नीरव शांतता आणि माझ्या बुलेटची धड़धड़. एका अनोख्या तालावरच धुंद होत पौड कधी आले हेच कळले नाही.
भांबार्डेचा ताजमहाल - १५ फेब्रुवरी २०१५
भारत-पाकिस्तान मॅचने सगळे वातावरण क्रिकेटमय
बनवून टाकले होते. आम्ही मात्र भांबार्डेचा ताजमहल
(नवरा-नवरी-करवली) पहायला १४ तारखेला रात्रीच निघालो. जुन्या मुंबई-पुणे हायवेला
लागलो आणि बाईक सुसाट ताणल्या. थंडी कमी झालेली पण त्या वेगाला अंगाला झोंबणारे बोचरे वारे चांगलीच हुडहुडी भरवत होते, तरीही वेगाचे वेड काही
सिंहगड - ८ फेब्रुवारी २०१५
रविवार सकाळी सिंहगड म्हणजे अनेक हवशे-नवशे लोकांची जणु
झुंबडच असते. पंढरीच्या वारीप्रमाणे दर रविवारी न चुकता येणारे,
कुणी
फक्त फोटु-फोटु खेळायला आलेले, कुणी फिटनेससाठी अवजड बोचकी खांद्यावर बाळगत चालणारे,
तर
कुणी रमत-गमत गप्पा-गोष्टी करत चालणारे. इथे पहिल्या पाच मिनिटांत 'आता थोडे थांबुयात'
म्हणणारे
पण
घाटवाटा - उपांड्याघाट ते मढेघाट १४ डिसेंबर २०१४
रविवारी सकाळी ६ वाजता निघणार होतो पण चारचे आठजण झालेले त्यामुळे वाट पाहण्यात एक तास खर्ची पडला. सरतेशेवटी 'विनायक, राहुल, मंदार, संजय, गणेश, विराट, ऐश्वर्या आणि मी' असे ८ जण सकाळी ७ वाजता सिंहगड रोडवरून निघालो. पाबेघाटात ढग व धुक्याचा अप्रतिम नजराणा व त्यातूनच डोकेवर काढणारे राजगड व तोरणा असे दृष्य अनुभवले. वेल्हयात नाष्टा करुन पुढे निघालो. केळदखिंड पार करून मढेगाव गाठले. 'गाड्या गावातच लावा, म्हणजे नीट राहतील' हे गावकऱ्यांचे म्हणणे दुर्लक्षित केले (परत आल्यावर कळले की एका गाडीतले पेट्रोल कोणीतरी काढले) व वाट विचारुन गाड्या तशाच पुढे दामटल्या. मढेघाटतील धबधब्याकडे जाताना डावीकडे एका शेडखाली गाड्या लावल्या व उपांड्याघाटाची वाट धरली. खिंडीत पोचल्यावर दिसणारे दृश्य लाजवाबच होते. डावीकडे दुरवर धुक्यातुन डोकावणारा वरंधाघाट व कैवल्यगड (कावळ्या), खालील बाजूस दिसणारी हिरव्यागर्द झाडित वसलेली गावे तर उजव्याबाजूस दिसणारा मढेघाट व त्या पलिकडिल गाढवकडा. सगळा परिसर न्याहाळतच खाली उतरायला सुरुवात केली. वाट चांगलीच रूळलेली आहे व सोबतीलाच पाण्याची पाइपलाइन त्यामुळे चुकण्याचा प्रश्नच येत नाही. साधारण तासाभरातच कर्णवाडीत पोचलो. उजवीकडे जाणाऱ्या छोट्याश्या गाडीरोडने पुढे गेल्यावर उजव्या बाजूला विहीर लागते. त्यापुढिल चार घरे सोडली की उजव्या बाजूला एक पाउलवाट वरती जाताना दिसते. तीच वाट मढे घाटातून वाहणाऱ्या धबधब्याच्या वाटेला मिळते. खरी वाट धबधब्याच्या वाटेच्या डाविकडून वरती जाते पण आम्ही धबधब्याच्या वाटेनेच वरती निघालो व हरिश्चंद्रगडाच्या नळीच्या वाटेचा अनुभव घेतला. वाटेतच जरावेळ विश्रांतीसाठी थांबल्यावर बॅगेतून फळे, ब्रेड, बटर असे जिन्नस बाहेर डोकावु लागले. ते पोटात ढकलुन वरती वाटेतीलच थंडगार पाणी पिले. धबधब्याच्या छोट्याश्या धारेखाली डोके भिजवल्यावर आत्मापण शांत झाला. त्यानंतरची अर्ध्या-पाउण तासाची खडी चढण मात्र चांगलीच दमछाक करणारी होती. सरते शेवटी मढेघाटाच्या माथ्यावर पोचलो. थंडगार वाऱ्याने धबधब्यातील तुषारांचा अंगावर शिडकाव होताच उरलासुरला शिणवटाही दूर झाला. चार तासांच्या छोट्याश्या ट्रेकची सांगता झालेली. गाड्या काढून परतीचा मार्ग धरला परंतु मुसळधार पावसात चिंब भिजत या घाटवाटा अनुभवायची रुखरुख मात्र तशीच मागे राहिली. त्यासाठी आता वर्षभर थांबण्याशीवाय गत्यंतर नाही.
बामणोली - ८ नोव्हेंबर २०१४
वासोटा - सह्यवेडे ८,९ नोव्हेंबर २०१४
वयवर्ष ६ ते ८२ सर्व वयोगटातील मिळून ७० हरहुन्नरी कलाकार सामील झाले होते आणि विशेष म्हणजे ज्या उत्साहाने ६ वर्षाचे पोर उड्या मारत गड चढत होते, तोच उत्साह, आनंद, कुतूहल ८२ वर्षाच्या आजोबांच्या चेहर्यावरपण होते. रात्रभर रंगलेला गप्पांचा फड, जुन्या-नवीन गाण्यांनी सजलेली अंताक्षरी, श्री. अरुण लोंढे काकांनी बाजावर (mouth organ) वाजवलेली व सोबतच सुरेल आवाजात गायलेली जुनी गाणी, लुप्त होत चाललेल्या मर्दानी खेळांचे ‘दांडपट्टा व लाठी’ शिवामृत सूर्यवंशीने दाखवलेले चित्तथरारक प्रात्यक्षिक, वयाची सत्तरी पार केल्यावर नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण करताना आलेल्या अनुभवांचे श्री. अशोक चौबळ यांनी केलेले कथन. सोबतीला वासोट्याच्या घनदाट जंगलवाटा, दूरवर खुणावणारी नागेश्वर, चांगदेव, रसाळ, सुमार, महिपतगडची डोंगररांग, भग्न वाडयाचे गतवैभवाची जाणीव करून देणारे अवशेष, घनदाट जंगलाच्या वेढ्यातुन डोकेवर काढणारा जुना वासोटा व कितीही डोळे विस्फारून पहिले तरी नजरेत न सामावणारा ‘बाबुकडा’.
सगळेच कसे एकदम फक्कड जमून आले. बऱ्याच वर्षांपासून करायचा राहून गेलेला वासोटा ट्रेक 'सह्यवेडे' ट्रेकर्समुळे एक अविस्मरणीय अनुभव देऊन गेला.
आजोबा किल्ला - २८ सप्टेंबर २०१४
आठवणी
दिवाळी
सर्वत्र दिसणारा रंगीबेरंगी आकाशदिव्यांचा लखलखाट, भल्यापहाटे सुगंधी उटणे लावून केलेले अभ्यंगस्नान, नविन कपड्यांची घडी मोडून सर्वात आधी फटाके फोडायला जाण्यासाठी चाललेली धावपळ, मित्रांबरोबर गप्पागोष्टी करत देवळात जाणे, 'चिवडा, लाडू, करंजी, शंकरपाळे, अनारसे' अशा बहुरंगी फराळावर सर्व मित्रमंडळीं जमवून यथेच्छ ताव मारणे, जिथे बांधकाम चालू असेल तेथून माती-वीटा पळवुन आणून बनवलेला किल्ला, तो बनवताना सर्वांग चिखलाने माखल्यामुळे बसलेला ओरडा, दिवाळीतील गृहपाठाचा ससेमिरा चुकवून दुपारी रंगलेला पत्यांचा डाव, सुट्टीत सहकुटुंब केलेली एखादी सफर.
अशा अनेक रम्य आठवणींनी मंतरलेला दिवाळीतील काळ, आता मात्र रोजच्या धावपळीच्या शर्यतीत कुठेतरी हरवून गेलाय. आता फक्त दिसतो तो चकचकीत ऑफिसच्या काचेतुन बाहेरील आकाशदिव्यांचा लखलखाट, पण त्यांचा प्रकाश काही माझ्यापर्यंत पोहचत नाही.
एक प्रवास
सभोवताली अस्सिम गर्दी असुनही एकट्यानेच चाललेला ट्रेनचा प्रवास, नशिबानेच मिळालेली खिडकितली जागा, संध्याकाळची उलटून गेलेली कातारवेळ , निरभ्र आकाशात आपल्याबरोबर धावणारी शुभ्र चंद्रकोर, अंगाला झोंबणारा थंडगार वारा, बोगद्यातुन जाताना अंगावर उडालेले तुषार, सोबतीला मागील भेटितील आठवणी व कानात गुनगुनणारा सौमित्र. कधीच संपुनये असा वाटणारा प्रवास शेवटी आपले स्टेशन येते व भुतकाळात हरवलेल्या आपल्या मनाला वर्तमानकाळात आणून सोडतो. मागे राहतात त्या फक्त्त आठवणी ज्या पुरून उरणार असतात पुढील प्रवासापर्यंत.
सागर मेहता
Subscribe to:
Posts (Atom)